
पार्वतीबाई शिवाजी कदम यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. अतिशय कष्टाळू, प्रामाणिक, कर्जत येथील पार्वतीबाई शिवाजी कदम वय (90) यांचे वृद्धापकाळाने काल दिनांक 11 मार्च 2025 रोजी दुःखद निधन झाले. वयोवृद्ध असलेल्या व सर्वांचे प्रेमाने वागणाऱ्या मातोश्रीचे दुखद निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी,पुतणे, सुना, नातवंडे आसा मोठा परिवार आहे. कर्जत येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते अहमदनगर जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक पनाजी कदम यांच्या त्या मातोश्री होत.







