करण भाऊ चव्हाण बिघडवणार आ .राम शिंदे , आ.रोहित पवार यांची समीकरणे , कर्जत जामखेड मतदार संघात परिवर्तन अटळ : करण भाऊ चव्हाण

Google search engine

 

कर्जत जामखेड मतदार संघाचे कित्येक वर्षापासून आमदार बदलले पण प्रश्न तेच राहिले त्यामुळे यावेळी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (A) गटाचे अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार करन भाऊ चव्हाण यांच्या रूपाने खरा उमेदवार मतदार संघासाठी उभा राहिला असून त्यांनी प्रचारात जोरदार आगेकूच केल्याने खरा पर्याय कर्जत जामखेड मतदार संघात उभा राहिला आहे .

कर्जत तालुक्यात दोन आमदार असल्यामुळे तालुक्याची मोठी भरभराट होईल , विकास काम होतील या आशावरती तालुक्यातील जनता , तरुण , बेरोजगार कार्यकर्ते अवलंबून होते . मात्र या दोन्ही आमदारांनी भ्रमनिरास केला .

तालुक्यातील तरुणांना रोजगार देणारा एमआयडीसी सारखा प्रकल्प लोकप्रतिनिधींच्या महत्त्वकांक्षा पोटी श्रेय वादामुळे प्रलंबित असल्यामुळे अनेक तरुण रोजगारापासून वंचित राहिले. मोठ्या प्रमाणात तरुण उच्चशिक्षित पदवी , पदविका घेऊन बेरोजगार आहेत. हाताला काम नसल्यामुळे हताश होऊन आणि तरूणांचे वय झालेले असून सुद्धा नोकरी नसल्याने लग्न होत नाही.

तसेच या भागातील सीना धरणाची दीड मीटर उंची वाढवण्याचा प्रस्ताव मंत्रालयात पडून आहे. अतिशय कमी खर्चात दीड मीटर उंची वाढल्यामुळे दीड टीएमसी पाणी अतिरिक्त साठा वाढणार असून यासाठी जमीन अधिकरण करण्याची गरज नाही त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल २० ते २५ किलोमीटर कालव्याची लांबी सुद्धा वाढवण्यात येईल . मिरजगाव मध्ये ट्रॉमा सेंटर असूनही अद्यापही काम चालू करण्यात आले नाही . मिरजगाव वरून अहिल्यानगर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग झाला आहे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघातांची मालिका चालू आहे वेळेवर उपचार न मिळालेले रुग्णांना मृत्यूला तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे मिरजगाव येथे मंजूर असलेल्या ट्रॉमा सेंटर लवकरात लवकर चालू करण्यात यावी तालुक्यातील अनेक वर्ष प्रलंबित असलेला एसटी डेपो सुद्धा अद्यापही झालेला नसल्यामुळे तालुक्यातील शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना प्रवाशांना मोठी कुचंबा न होत आहे एसटी डेपोवरून अनेकदा राजकारण केले आहे तरी प्रश्न सुटला नाही तसेच या परिसरात ३४ गावांना वरदान ठरणारी तुकाई चारी सरकार बहुतेकांशी प्रकल्प कामे बंद आहेत तूकाईचारी सारखा महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण झाला तर ३४ गावांना वरदान ठरणार असून या भागातील शेतीचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी भेटेल व दुष्काळी भागात सुजलाम सुफलाम होईल या परिसरात मध्ये तालुक्यातील जलजीवन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे अजून काही कामे बंद आहेत अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही दोन लोकप्रतिनिधी असल्यामुळे या पद्धतीने तालुक्यांतील अनेक प्रलंबित प्रश्न कामे होत नसल्यामुळे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्ष कर्जत तालुक्यात मोठे आंदोलन उभा करणार आहे दोन्ही आमदारांचा तालुक्यातील जनतेला अनुभव आलेला आहे हे फक्त श्रेयवाद आणि स्वतःचं नाव मोठं करण्यात गुंतलेले आहेस असून या पुढील काळात जनता ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पाठीमागे पूर्ण ताकतीने उभे राहून या मतदारसंघांमध्ये करण भाऊ चव्हाण यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातून तेच आमदार होतील अशी प्रतिक्रिया यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.