आ.रोहित दादा पवार विक्रमी मतांनी विजयी होतील : ज्ञानदेव पाबळे मा.सरपंच बाभुळगाव खालसा 

Google search engine

 

आमदार रोहितदादा पवार यांच्या विकास दूरदृष्टी ही सर्व मतदार संघातील सर्वसामान्य जनतेला भावत असून आ.रोहित दादा पवार यांच्या जनसंपर्कामुळे ते मोठ्या मतांनी विजय संपादन करतील अशी प्रतिक्रिया बाभुळगाव खालसा चे माजी सरपंच ज्ञानदेव पाबळे सर यांनी दिली.

कार्यसम्राट , आमदार रोहित पवार यांच्या मार्फत बाभुळगाव खालसा येथे  पाणंद रस्ते ,शाळा पेव्हर ब्लॉक ,काँम्पूटर कोडींग लँब, दोन खोल्या , स्मशानभूमी,२ कोटीची जलजीवन योजना आदी विकासकामे झाली. त्यामुळे आ.रोहीत दादा यांच्या विकासकामावरती बाभुळगाव खालसा येथील सर्वसामान्य जनता खुश असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. व आ.रोहीत दादा पवार यांना विकासकामांच्या बळावर मतदान रुपी आशीर्वाद सर्वसामान्य जनता नक्की देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

गेल्या पाच वर्षात रोहित पवार यांनी मतदारसंघात लोकाभिमुख, प्रगतिशील आणि दूरदृष्टीपूर्ण विकासकामे केली आहेत. शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधा अशा महत्त्वाच्या क्षेत्रात सुधारणा करून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यांनी पाच वर्षात दिलेले शब्द पुर्ण केले. त्यांच्या कार्यशैलीमुळे प्रामाणिक, ध्येयवेडे आणि स्वाभिमानी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. जनसामान्यांसाठी झगडणारा, स्वाभिमानाने लोकांसाठी लढणारा असा त्यांचा लौकिक आहे. मतदारसंघाच्या कायापालट करण्याच्या ध्येयाने विकासाचे व्हिजन ठेवत त्यांनी आपल्या कामातून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. जनतेचा अपार विश्वास आणि विकासाची दूरदृष्टी असलेल्या रोहित पवार यांच्याकडे उद्याचं राज्याचे नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. विकासाचे ध्येय आणि जनहिताची निष्ठा जोपासणाऱ्या या नेत्याच्या पाठिशी पुन्हा एकदा संपूर्ण कर्जत-जामखेडकर एकवटला आहे. त्यामुळे ही निवडणुक कोणी कशावरही नेण्याचा प्रयत्न केला तरी ही निवडणूक विकास ह्या एकाच मुद्यावर होणार आहे आणि यामध्ये आमदार रोहित पवार यांची कित्येक पटीने सरशी होणार हे निश्चित आहे .

आपली बाभुळगाव खालसा मतदार जनता.